पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये – शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी /  मंगळवारी कोल्हापूर येथे आघाडीच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदींचा चांगलाच टोला लगावला. मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असे बोलून मोदींच्या वर्ध्यातील वक्त्याला प्रतिउत्तर दिले.

‘अजित पवार उत्तम काम करतात तसेच ते उत्तम प्रशासक असल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष जनतेचा असून कोणा एका व्यक्तीचा नाही.’असे शरद पवार कोल्हापुरातील भाषणा म्हणाले.राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांची पकड सैल होत असून अजित पवार पक्षाचा ताबा घेत असल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते, याला प्रतिउत्तर देताना शरद पवार बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचार सभेत केलेल्या भाषणात पवार कुटुंबावर टीका केली होती.

वर्ध्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी पवार आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर म्हणून पवार यांनी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांची स्तुती केली. गांधी कुटुंबाने देशामध्ये बरेच बदल घडविल्याचे ते म्हणले. तसेच गांधी कुटुंबाने देशाची बांधिलकी जपली असे पवार म्हणाले.
इतर महत्वाचे –

आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

अमित शहांच्या विरोधात काँग्रेसकडून हा उमेदवार

या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

Leave a Comment