मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने मलिक अशी वक्तव्य करत आहेत; भाजप नेत्याची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. मलिक यांच्या आरोपानंतर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत आहेत, असा टोला टोला लगावला आहे.

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नवाब मलिक रोज हर्बल टोबॅकोचा वापर करत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला आहे. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झाले आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,” अशी टीका कंबोज यांनी केली आहे.

यावेळी कंबोज मलिकांवर टीका करताना पुढे म्हणाले की, भाजपवर टीका करणाऱ्या मलिक यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत.

काय म्हणाले होते नवाब मलिक

काल माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीका होती. यावेळी ते म्हणाले होते की, “वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. हिमाचल सरकारने, गोवा सरकारने हाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजप नेत्यांनी सांगावे. तसेच भाजप नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने, त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का? त्यांनी आम्ही दारू पिणार नाही अशी शपथ घ्यावी, अशी मागणीही यावेळी मलिक यांनी केली.

Leave a Comment