Monsoon Delays | मौसमी वाऱ्याचा वेग मंदावला; महाराष्ट्रात मान्सूनमध्ये पडणार खंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon Delays | राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनचा सुरुवात झालेली आहे. अशातच आता मानसूनबाबत भारतीय हवामान खात्याकडून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. हवेच्या दाबाची स्थिती आता अनुकूल नसल्याने मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेले माहितीनुसार 20 जूननंतरच पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, असा देखील सल्ला दिलेला आहे.

दरवर्षी पेक्षा या वर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये (Monsoon Delays) दाखल झालेला आहे. मुंबईत देखील मोसमी वाऱ्याचा आगमन दोन दिवस अधिक झालेला आहे. राज्यातील अनेक भागात आत्तापर्यंत मुसळधार पाऊस देखील पडला आहे. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे.

त्याचप्रमाणे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडलेली शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. परंतु सध्या हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने वाऱ्याचा वेग देखील मंदावला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहे. 20 जूननंतर राज्यात सगळ्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.

आज कुठे कुठे कोसळणार पाऊस? | Monsoon Delays

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे. ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच मराठवाडा विभागातील पुढील 72 तासात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.