मान्सून केरळमध्ये २८ मे रोजी पोहोचणार तर महाराष्ट्रात कधी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात यावर्षी मान्सून कदाचित वेळेआधीच दाखल होऊ शकेल. स्कायमेट या खासगी कंपनीने मान्सून आणि हवामानाबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मान्सून हा १ जूनऐवजी २८ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. या एजन्सीच्या म्हणण्यानुसार यावेळी मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या ४ ते ५ दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात येऊ शकेल.

देशाच्या अधिकृत हवामान कार्यालयाच्या आयएमडीने अंदमान समुद्रात मान्सून २२ मेपर्यंत येण्याची शक्यताही वर्तविली आहे, परंतु केरळला तो पोहोचण्याची तारीख ही १ जूनपर्यंत कोणताही बदल न करता करण्यात आली आहे. स्कायमेट यांनी दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा नैऋत्य मान्सून २८ मे रोजी केरळ किनारपट्टीवर पाऊल ठेवू शकेल.

स्कायमेट पुढे म्हणाले की, मान्सूनचा प्रवाह हा गेल्या शनिवारी-रविवारी अंदमान समुद्राच्या दिशेने वर चढताना दिसला आहे, जो २२ मे च्या सामान्य तारखेच्या सुमारे ४ दिवस आधीच आलेला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने असेही म्हटले आहे की यंदा पावसाळ्यासाठी हंगामी परिस्थिती अनुकूल असल्याचे दिसते. यावर्षी अंदमान समुद्रातील हवामान ब्युरोने २० मे ते २२ मे दरम्यान नॉर्मल ऑनसेट डेटमध्ये बदल केला आहे. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ही १ जून कायम ठेवण्यात आली आहे. पहिल्या मान्सूनच्या घोषणेत आयएमडीने म्हटले आहे की, यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून देशात सामान्य राहील, त्याची सरासरी सुमारे १०० टक्के असेल, जे ८८ सेंटीमीटर असेल. विशेष म्हणजे अंदमान निकोबारमध्ये मान्सून साधारणत: २० मे नंतर येतो, त्यानंतर केरळला पोहोचण्यासाठी त्याला अजून १०-१२ दिवस लागतात.

आयएमडीच्या अहवालानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत मान्सून सामान्य तारखांच्या तुलनेत ३ ते ७ दिवस उशीरा येईल. दिल्लीसाठी मान्सूनची सुरुवात २३ जून ते २७ जून दरम्यान असेल. त्याचप्रमाणे मुंबई आणि कोलकाता येथे १० ते ११ जून तर चेन्नईमध्ये १ ते ४ जून या कालावधीत येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment