ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – प्रेयसीसोबतचं लग्न फिसकटल्याने तणावात असलेल्या तरूणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कॉलेजमध्ये असताना या तरुणाची एका मुलीबरोबर ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. इतकंच नाही तर दोघांच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. पण अचानक तरूणीने संपर्क तोडल्याने तरुणाने मानसिक तणावात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

काय आहे प्रकरण
मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. त्यासाठीच्या तयारीसाठी तो इंदुरला जाण्यासही तयार होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी इंदूरला पाठवलं. काही दिवसांत त्याची बहिणदेखील शिक्षणासाठी इंदूरला आली आणि ते दोघं एकाच घरात राहून शिक्षण पूर्ण करत होते. यानंतर इंदुरला शिकत असताना राजेशची ओळख कॉलेजमधील एका तरूणीशी झाली. यांनतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. यानंतर त्यांच्या लग्नाची बोलणीदेखील सुरु होती.

आपल्या आवडत्या मुलीसोबत लग्न होणार असल्याने राजेश आनंदी होता. पण तरूणीने अचानक राजेशसोबतचा संपर्क तोडला. त्याला भेटणंही ती टाळत होती. यामुळे तो प्रचंड तणावात होता. राजेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याच्या प्रेमप्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मात्र त्यातील तपशील पोलिसांनी अद्याप जाहीर केला नाही. बुधवारी राजेश आणि त्याची बहिण जेवण करून झोपले होते. यानंतर सकाळी जेव्हा बहिणीला जाग आली तेव्हा तिला राजेशचा मृतदेह छताला लटकलेला दिसला. तिनं तातडीनं पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment