MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कृषी सेवेच्या 258 पदांबाबत निर्णय जाहीर; वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MPSC | अनेक विद्यार्थी हे MPSC त्याचप्रमाणे UPSC या परीक्षेची तयारी करत असतात. MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा आता येत्या 25 ऑगस्ट रोजी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे आता सगळेच विद्यार्थी जोरदार तयारीला लागलेली आहेत. या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी जागा भरल्या जातात. अशातच आता या परीक्षेमध्ये कृषी सेवेत पदांचा देखील समावेश व्हावा, यासाठी विद्यार्थी आंदोलन केले होते. त्यांच्या मते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कृषिसेवेतील 258 पदांचा समावेश केला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दिला होता. आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी देखील या प्रकरणावर त्यांची मांडलेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ, गट ब, गट ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदांचा समावेश महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परिपूर्व परीक्षेत करणे शक्य होणार नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काय भूमिका मांडली ? | MPSC

महाराष्ट्र कृषी सेवा गट अ आणि गट ब या संवर्गातील एकूण 258 पदे भरावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. हे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला 16 ऑगस्ट 2024 रोजी शासनाकडून मिळालेले आहे. परंतु आता ही पदे या संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. परंतु ही परीक्षा संदर्भात दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झाले, नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता जाहिरातीमध्ये या पदांचा समावेश करणे शक्य नसल्याची भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मांडलेली आहे.

येत्या 25 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी तरी कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. परंतु या भरती प्रक्रियेबद्दल पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येणार आहे. असे देखील लोकसेवा आयोगाने सांगितलेले आहे.

विद्यार्थ्यांची मागणी काय होती?

येत्या 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. आणि या परीक्षेमध्ये कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदांची वाढ व्हावी. अशी त्यांची मागणी होती. या परीक्षा 258 कृषी पदे भरली जवित असे विद्यार्थ्यांचे हणणे होते. आणि त्यांनी या प्रकरणात त्यांची बाजू देखील मांडली होती. परंतु कृषी विभागाकडून ही मागणी 16 ऑगस्ट रोजी देण्यात आली. परंतु त्यावेळी उशीर झाल्याने लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही मागणी फेटाळली आहे. परंतु पुढील येत्या परीक्षेत या पदांची नियोजन करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.