मोठी घोषणा! मजुरांसाठी स्वस्त भाडं असलेली घरं आणि मुद्रा कर्जदारांना व्याजातून २% दिलासा- अर्थमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रवासी मजुरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. प्रवासी मजूर आणि शहरी गरीब मजुरांसाठी कमीत कमी खर्चात राहता यावं यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून कमी भाडं असेल अशी घरं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उद्योगपती, राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. लघु कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या लोकांसाठी व्याजात २% सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रा शिशु कर्ज घेणाऱ्या लोकांना १ लाख ६२ हजार कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या व्याजात २% कपात करुन हे १५०० कोटी रूपये माफ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

या व्यतिरिक्त, देशातील ८ कोटी मजुरांना, जे दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या राज्यात परतले आहेत त्यांना पुढील २ महिन्यांसाठी ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारतर्फे देण्यात आला आहे. ही घोषणा प्रति व्यक्तीसाठी करण्यात आली असून याची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या योजनेसाठी ३५०० करोड रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच केंद्रानं दैनंदिन कामगारांना देण्यात येणारं दिवसाचं मानधन १८२ रुपयांवरून २०२ रुपयांवर नेण्यात आल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं. १ लाख ८७ हजार ग्रामपंचायतीद्वारे २ कोटी ३३ लाख कामगारांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे काम देण्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment