Mumbai Local : मुंबई लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! ‘या’ मार्गावर सुरु होणार नवीन रेल्वे लाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway) लवकरच करजत ते पनवेल दरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार होणार असून, त्यामुळे लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद होणार आहे. रेल्वे प्रशासनाने 29 किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गासाठी सविस्तर योजना तयार केली असून, 491 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. ही चौथी रेल्वे लाइन करजत-पनवेल मार्गावर (Mumbai Local) असेल, ज्यामुळे सध्याच्या प्रचंड गर्दीचा ताण कमी होणार आहे.

मुंबईच्या वाढत्या गर्दीवर उपाय (Mumbai Local)

मुंबई आणि उपनगरांतील वाढती लोकसंख्या, वाढती घरांच्या किंमती आणि सीमित वाहतूक पर्याय यामुळे अनेक नागरिक ठाणे, डोंबिवली, कर्जत व पनवेल भागात स्थलांतर करत आहेत. यामुळे लोकल ट्रेन हीच प्रवासाची प्रमुख आणि आवश्यक साधनं ठरली आहेत. मात्र, प्रचंड गर्दी आणि प्रवासातील अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. ही नवीन रेल्वे लाइन या अडचणी कमी करून प्रवाशांना अधिक सुलभ, वेळेत आणि सुरक्षित सेवा देईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.

डीपीआर तयार,मंजुरीची प्रतीक्षा (Mumbai Local)

या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. एकदा अंतिम मंजुरी मिळाली की, प्रकल्पाची अंमलबजावणी लगेचच सुरू होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर आणि त्याच्या उपनगरातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणास पोषक ठरणारा असून, रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याच्या व्यापक योजनेचा भाग आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी

या रेल्वे विस्ताराचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. प्रस्तावित लाइनमुळे पनवेलपासून फक्त 17 किमी अंतरावर असलेल्या विमानतळापर्यंत रेल्वे मार्गाने सहज पोहोचता येणार आहे.

ही सुविधा मेट्रो, महामार्ग आणि रेल्वेचा समन्वय साधून प्रवाशांना एकात्मिक वाहतूक सेवा पुरवेल. त्यामुळे मुंबई व उपनगरांतील प्रमुख भागांतून विमानतळावर जाणं अधिक जलद आणि सोयीचं होणार आहे. (Mumbai Local)

करजत-पनवेल नवीन रेल्वे लाइन ही सेंट्रल रेल्वेवरील ऐतिहासिक पावले ठरणार आहेत. या रेषेच्या माध्यमातून केवळ गर्दीवर नियंत्रण मिळणार नाही, तर शहरी विकासाला गती, प्रवासाला गती आणि विमानतळाशी अधिक सोपी जोडणी मिळणार आहे.
मुंबईच्या प्रवाशांनी लवकरच या नव्या सुविधेची तयारी ठेवावी!