आशिष शेलारांनी लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली आहे; महापौरांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जानेवारीला मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची घोषणा केली. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. चार वर्षात मालमत्ता कर माफ का केला नाही? मुंबईकरांवरचे ठाकरे सरकारचे प्रेम हे बेगडी प्रेम आहे, अशी टीका शेलारांनी केली. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिली असून शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची आणि लोकांमध्ये आग लावण्याची सुपारी घेतली असल्याचे म्हंटले आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार शिष्य शेलार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची आणि आग लावण्याची सुपारी घेतली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते आग लावण्याचे काम करत आहेत. आपण मुंबईकरांना काहीतरी चांगले देत आहोत. भाजपकडे बोलायला काही राहिले नाही, म्हणून शेलार अशा पद्धतीची टीका करीत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने कर माफीची एक घोषणा केली होती. त्यामध्ये त्यांनी कर माफीच्या दृष्टीने अनेक मुद्दे मांडले होते. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी बिल्डरांना 11 हजार कोटींची मदत केली, त्यावेळी कर माफीची आठवण का झाली नाही? दारू, रेस्टॉरंट यांना मदत केली त्यावेळी मालमत्ता कर माफीची आठवण का झाली नाही? असे अनेक सवाल करीत 4 वर्ष मालमत्ता कर वसूल केला तो मुंबईकरांना परत द्या, अशी मागणी करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शेलार याच्या टीकेला महापौर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Comment