ठाकरे सरकारमुळेच मुंबई आज ICU मध्ये – राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरे सरकारमुळेच मुंबई आयसीयू मध्ये गेली असल्याचे ट्विट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात सुरु झाल्यापासून हे टीकास्त्र सुरु आहे. सातत्याने ठाकरे सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात तसेच राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याचे राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली असून आरोपही केला आहे.

निलेश राणे यांनी आज मुंबई हे एक जागतिक शहर आहे, ज्याची दयनीय अवस्था झाली आहे. आणि ही स्थिती केवळ ठाकरे सरकारमुळे आली आहे. असे ट्विट केले आहे. लोकं मेली तरी चालेल पण ठाकरे सरकारची प्रतिमा खराब होता कामा नये. असे म्हणत त्यांनी हा आरोप केला आहे. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे मुंबईमध्येच झाले आहेत.

 

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७७ हजार पार गेली आहे. पैकी ३४ हजाराच्या जवळपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण २,७१० मृत्यू झाले आहेत. मुंबई राज्यातीलच नाही तर देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे शहर आहे. देशातील सर्वाधिक मृत्यूही मुंबईतच झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment