मनपा प्रशासकांचा सायकल दौरा; खाम नदीला दिली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोणताही फौजफाटा न घेता सायकलवर स्वार होऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी औरंगाबादेतील ऐतिहासिक खाम नदीला भेट देत त्याठिकाणी असलेल्या नागरिकांची विचारणा केली.

मनपा प्रशासक पाण्डेय यांनी खामनदी विकास कामाची पाहणी करत अधिकारी-कर्मचारी आणि कामगार यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामाची चर्चा करून 50 हजार वृक्षांची लागवड करण्याचे आदेशही त्यांनी दिले. सामाजिक वनीकरण व व्हीएसटीएफ(व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन) या संस्थेच्या माध्यमातून खाम नदीवर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. 25 जानेवारी 2019 पासून ते आज पर्यंत कमी कालावधीमध्ये खाम नदी चा कायापालट करून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. प्रत्येक शनिवारी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, छावणी परिषद, व्हॅरॅक, विविध स्वयंसेवी संस्था, आणि लोकसहभागातून हे शक्य झाले आहे.

त्यांच्यासोबत चिरंजीव देवमान पाण्डेय हे होते.यावेळी कर्मचारी कामगार त्यांच्यासह छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, जिल्हा उत्खनन अधिकारी अतुल दौंड, मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, देविदास पंडित,एम.के. फालक,बी.डी. फड, सामाजिक वनीकरण अधिकारी गायकवाड,स्मार्ट सिटी चे आदित्य तिवारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान ,विशाल खरात यांच्याशी चर्चा करून विकास कामाचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यातील कामाची डीपीआर नुसार चर्चा केली. नुकतेच औरंगाबाद शहराला केंद्र सरकारचा सायकल फॉर चेंज पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी सायकलवर बसून नागरिकांना आणि खाम नदीला भेट दिली. या माध्यमातून सायकलचा वापर करण्याचा संदेश देऊन पर्यावरण, प्रदूषण व स्वास्थ्य,आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक पाण्डेय यांनी केले आहे.

Leave a Comment