इस्लामपूरात खून का बदला खून ; एक अटक, तिघे फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तुजारपूर येथील अर्जुन प्रल्हाद बाबर याने भाच्याच्या मदतीने अक्षय उर्फ तुकाराम अशोक भोसलेचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. खून प्रकरणात मृत अक्षयचा मित्र मदन संभाजी कदम यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य संशयित अर्जुन बाबरसह त्याचा भाचा सूरज संपत गायकवाड याच्यासह अन्य एकजण फरार आहे.

गुरुवारी रात्री साडे आठ वाजता उरूणवाडी रस्त्यावर अक्षय भोसलेचा चाकू व धारधार कोयत्याने पाठलाग करत 29 वार करून निर्घृणपणे खून केला होता. आर्थिक देव-घेवीतून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण या प्रकरणी अक्षयचा मित्र मदन कदम याला अटक केल्यानंतर खुनाचे नेमके कारण पुढे आले आहे. ठाणे येथे आर्थिक देवाण-घेवाणीतून शिवाजी प्रल्हाद बाबर यांचा 2015 साली खून झाला होता. या खून प्रकरणात मृत अक्षय हा मुख्य संशयित होता. न्यायालयाने अक्षयची 2018 मध्ये निर्दोष मुक्तता केली होती. मदन कदमला अटक करून पोलीसी खाक्या दाखवल्यावर खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले. मदन कदमवर विनयभंग, मारामारी, जबरी चोरीसह पीठा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

आपल्या भावाचा खून करून अक्षय भोसले हा गावाकडे येवून उजळ माथ्याने फिरत आहे. मार्च महिन्यात लग्न करून संसार थाटला आहे. तसेच इस्लामपूर येथील मटण मार्केट मध्ये दसऱ्यापासून ए-वन फिश सेंटरच्या माध्यमातून मासे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यावरून अर्जुनच्या मनात अक्षयबाबत मोठा राग होता. दोन दिवस पाळत ठेवून गुरुवारी रात्री उरुणवाडी रस्त्या वरील विश्वास बारपटे यांच्या शेताजवळ अर्जुन बाबर याने भाचा सुरज गायकवाड, मित्र मदन कदम व एकाच्या अनोळखी इसमाच्या मदतीने अक्षयचा खून केला. आणि फरारी झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment