BSNL बाबत मोदींचा मोठा निर्णय; 4G नेटवर्कच्या प्रसारासाठी स्वदेशी उपकरणे करणार विकसित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये भारतातील अनेक आघाडीच्या आणि लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel यांनी वोडाफोन आयडिया यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्ती झालेली आहे. आणि याचा फायदा बीएसएनएल या कंपनीला झालेला आहे. ते म्हणजे गेल्या एक महिन्यात बीएसएनएलच्या युजर्समध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. ग्राहकांची आता वाढती संख्या पाहता बीएसएनएलने देखील त्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बीएसएनएल ही एक सरकारी इत्यादी कंपनी आहे. यामुळे आता बीएसएनएल टाटासोबत 100 गावांमध्ये 4G नेटवर्क सुरू करण्याचा करार केलेला आहे. या संदर्भाची चाचणी देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे आता लवकरच 1 हजार गावांमध्ये बीएसएनएलचा 4G नेटवर्कचा अनुभव मिळणार आहे.

इतर टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज प्लॅन वाढल्यामुळे अनेक ग्राहक आता बीएसएनएलकडे वळलेले आहेत. आणि या संधीचा फायदा देखील बीएसएनएलने घेतला आहे. बीएसएनएलने त्यांची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी देखील चाचणी सुरू केलेली आहे. 4Gसेवा पुरवण्या सोबतच तयारी केलेली आहे. याबाबत भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक खुलासा केलेला आहे. तो म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया ?

याबद्दल माहिती देताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, बीएसएनएलद्वारे स्वदेशी 4G उपकरणे वापरण्याचा निर्णयाचा पंतप्रधान मोदींनी घेतलेला आहे. त्यामुळे बीएसएनएलचा वापर होण्यासाठी भारतात बनवलेल्या उपकरणांचा वापर व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. या निर्णयानुसार बीएसएनएल आता स्वदेशी विकसित उपकरणे वापरून देशांमध्ये 4G नेटवर्कचा देखील प्रचार करणार आहे. त्यामुळे दळणवळण सुविधा अत्यंत सोपी आणि सुरक्षित होणार आहे.

TATA आणि BSNl चा करार

अशातच आता टाटा आणि बीएसएनएलने एक मोठा करार केलेला आहे. या त्यांच्या करारानुसार 1000 खेड्यांमध्ये 4G नेटवर्क सेवा सुरू करण्यात येणार आहे. या दोघांमध्ये जवळपास 15000 कोटी रुपयांचा करार झालेला आहे. महिन्याभरापूर्वी हा करार झाला. त्यानंतर आता गावांमध्ये इंटरनेटची चाचणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. अनेक लोकाची बीएसएनएलला पसंती देखील मिळालेली आहे.