31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, धनंजय मुंडेंनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पिक विमा अर्ज भरण्याचे काम चालू होते. देशातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरलेले आहेत. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. परंतु आता त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही तारीख वाढवून घेतली. तसेच आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पिक विमाचे 853 कोटी रुपये 1 ऑगस्ट पूर्वी मिळणार आहे. त्याबाबतची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

मागील वर्षी पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना जवळपास 4 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट पूर्वी त्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील येत्या आठवड्यात मुंबई येथे पिक विमा कंपनीचे अधिकारी मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे यांची एकत्र बैठक झाल्याचे देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलेले आहे.

अशातच आता काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाची जनसमानी यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या प्रश्नांकडे देखील लक्ष दिले. त्यानंतर त्यांनी तेथील शेतकऱ्यांची परिस्थितीची माहिती घेतली. या सभेच्या वेळी त्या ठिकाणी आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जयंत जाधव हे लोक देखील उपस्थित होते. या लोकांच्या उपस्थितीतच सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यात आलेली आहे.

याबाबत आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीक कापणी प्रयोगाद्वारे आणि उत्पन्नात आलेली घट यामुळे 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे आहे. याबाबतची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली. परंतु ही रक्कम आता 31 ऑगस्ट पर्यंत मान्य केली जाणार आहे. आणि जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.

मागील वर्षी म्हणजेच 2023 रोजी नाशिक जिल्ह्यातील जवळपास 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना जवळपास 79 कोटी रुपयांचा देखील लाभ झालेला होता. तसेच स्थानिक आपत्ती आणि काढणी यांच्या नुकसानापोटी 25 कोटी 89 लाख रुपये मंजूर झालेले होते.