आता कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय; मलिकांचा राणेंवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार अस भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून राणेंवर पलटवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत थेट कोंबड्याचा उल्लेख करत राणेंवर टीका केली आहे.

मलिक म्हणाले की, काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय असं मलिकांनी म्हटलं. तसेच यावेळी नवाब मलिक यांनी खंबीर सरकार आणि महाविकास आघाडी सरकार असे हॅश टॅग देखील वापरले

नारायण राणे नेमकं काय म्हणाले-

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही असं राणे म्हणाले.

Leave a Comment