तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करतोय ; जयंत पाटलांचे बाबासाहेब आंबेडकरांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 व्या महापरिनिर्वाण दिन (BR Ambedkar 64th Death Anniversary ). महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  जयंत पाटील यांनीही  #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे विनम्र अभिवादन केले आहे.

यंदा कोरोनाच्या परिस्थिती मुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी #LetterToBabasaheb ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जयंत पाटील यांनीही सहभाग घेऊन चैत्यभूमीला एक पत्र लिहिले आहे.

“प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे.” असं म्हणत जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment