राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुक स्वबळावर लढणार का??? अजित पवार म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणूक ही राज्यातील मोठी निवडणूक असून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी समोर भाजपचे बलाढ्य आव्हान असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडी खरंच मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार की स्वबळावर असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीची सध्या तरी मित्रपक्षांसोबत आघाडी करुन पुढं जायचं अशी चर्चा सुरु आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना आहे. शरद पवार, जयंत पाटील सर्वांना चर्चा करुन निर्णय घेतली. पण आमची मानसिकता आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये अशीच आहे. मतांची विभागणी होईन ना मला, ना धड तुला, दे तिसऱ्याला असं होऊ शकतं. मी तरी याबाबतीत सकारात्मक आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितंल.

मुंबई महापालिकेसाठी शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण जुळू शकतं का ? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आधीच अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांच्यासोबत चर्चा करु. महाविकास आघाडीला अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment