“तुम्हाला हनुमान चालीसाच्या दोन ओळी तरी म्हणता येतात का?”;राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याची घोषणा केली. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनसेवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “हनुमान चालिसा हनुमान चालिसा काय लावले आहे. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाहीत,” असे म्हणत अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरेंना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी आज राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या बाबतीत चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी मिटकरी यांनी म्हंटले की, “मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दंगली भडविण्याचे काम करीत आहेत. राज ठाकरे यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या.

तुम्ही नुकतीच एक घोषणा केली आहे की, मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावणार. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येतात का? त्याही तुम्हाला म्हणता येत नाही,” असा खोचक टोला मिटकरी यांनी यावेळी लगावला.

Leave a Comment