औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका, सरकारची नाही – प्रफुल्ल पटेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्यास शिवसेने कडून हालचाली सुरू असतानाच काँग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नामकरणास विरोध करत शिवसेनेला ठणकावले आहे. त्यामुळं आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनीही भाष्य केलं आहे.

‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे सरकारची नाही,’ प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा काढण्यात येईल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही,’ असंही पटेल यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment