ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते “रामभरोसे” राज्य – रुपालीताई चाकणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश मध्ये सध्या उत्तर प्रदेशात ब्लॉक प्रमुखाच्या निवडणुकीचा धामधुम सुरु झाली असून समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा भय़ंकर प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

ज्याला लोक “रामराज्य” समजतात ते खरं तर “रामभरोसे” राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे अस ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांचीही या घटनेवरून भाजपला खडेबोल सुनावले. महाभारतात कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केल्याचं आपल्याला माहीत आहे… पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय! कारण उत्तर प्रदेशात एका महिला भगिनीच्या वस्राला भाजपच्या लोकांनी भर रस्त्यात हात घातलाय… हे आधुनिक काळातील कौरव तर नाहीत ना? असं रोहित पवारांनी म्हंटल.

नक्की काय आहे प्रकरण-

समाजवादी पक्षाची एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, तिथे असलेल्या विरोधी उमेदवारांशी त्यांचा वाद झाला. यादरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

Leave a Comment