अजितदादांच्या नावे दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन कारवाईचे कारस्थान; नवाब मलिकांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवरनिशाण साधला आहे. राज्यात आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशात केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्याची मालमत्ता जप्त करून त्यामध्ये अजित पवारांचे नाव घेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे कारस्थान केले जात असल्याचे टीका मलिक यांनी केली.

राज्यातील अनेक नेत्यांवर ईडी तसेच आयकर विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी मलिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. कोणतीही संपत्ती हे बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्यातरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नाही.

मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल केले गेले. केवळ घाबरवण्याचा आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे पण आम्ही घाबरुन जाणार नाही. जो खेळ पश्चिम बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात केला जातोय. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता.

भाजपने अनेक नेत्यांवर दबाव टाकून त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. भाजपमध्ये गेलेले लोक सांगतात की, आम्हाला आता शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. मात्र राज्य सरकार किंवा यातील एकही नेता अशा कारवायांना घाबरणार नाही. जो अन्याय होत आहे त्याविरुद्ध लढा देऊ, असा निर्धार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Leave a Comment