आत्मनिर्भर म्हणजे भारताचं स्वतःचं सक्षमीकरण, दुसऱ्यांवर बहिष्कार नव्हे – निर्मला सीतारमन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्मनिर्भर भारताचा अर्थ इतरांना कमी लेखणे असा नसून स्वतःच अधिक सक्षम होण्याचा आहे. भारत स्वतःच्या कृतीने स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम होईल अशा अर्थाचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं २० लाख कोटी रुपयांच्या चौथ्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचनात्मक बदलासाठी काही धोरणे आखली असून त्याचीच अंमलबजावणी करणे हे येत्या काळातील उद्दिष्ट असेल असं सीतारामन पुढे म्हणाल्या.

भारताला जागतिक आव्हानं पेलता येण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धेसाठी तयार राहणं गरजेचं असून या क्षेत्रातील सुधारणांसाठी भारतीयांनी सज्ज रहावं असं नरेंद्र मोदींनाही वाटत आहे. याद्वारे गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रातील काम करत असताना मूलभूत बदल करावे लागतील असंही सीतारामन पुढे म्हणाल्या.

Leave a Comment