Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज; निर्मला सीतारमण यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. देशातील सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यावेळी त्यांनी केली. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे.

यावेळी सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. देशात डिजीटल विद्यापीठ स्थापन केली जाणार आहेत. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार आहेत. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही बसवला जाणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

तसेच 2.37 कोटी रुपये MSP द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. येत्या वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्यानं 5 जी सेवा सुरु करणार आहे. त्याचप्रमाणे सहकार क्षेत्राला भरावा लागणारा कर 18 टक्क्यांनुसार 15 टक्क्यावंर आणण्यात आला आहे. तसेच, को-ऑपरेटिव्ह सोसीयटी ज्यांचे उत्पन्न 1 ते 10 कोटी आहे. त्यांचा कर 12 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

Leave a Comment