पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा; वादग्रस्त वक्तव्यावर गडकरी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पटोलेंनी पंतप्रधानांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यविषयी नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचं, गडकरी यांनी म्हंटले आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले असून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी., अशी मागणी ट्विटद्वारे गडकरींनी केली आहे.

पंतप्रधान मोदींबद्दल काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही. नेता तसा कार्यकर्ता म्हणावा लागेल. त्याचे राष्ट्रीय नेते सुद्धा असेच मध्ये गायब होतात. पटोले याचे वर्तन हे आता भ्रमिष्टासारखे चाललेले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या वक्तव्यानंतर केली आहे.

पटोले नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी व्हिडीओमध्ये केले आहे.

Leave a Comment