महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे.
सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते.

पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे व दवाखान्यांतून नागरिकांना लस दिली जाते. परंतु, दोन दिवसांपासून पालिकेत लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिकेने सरकारकडे लसींची मागणी नोंदवली आहे; पण सरकारकडून अद्याप लस उपलब्ध करुन देण्यात आली नाही. त्यामुळे आहे तोच लसींचा साठा पुरवून वापरला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पालिकेकडे ३५०० लशींचे डोस होते. त्यातील दीड ते दोन हजार डोस गुरुवारी देण्यात आले. त्यामुळे केवळ दीड हजार डोस सध्या शिल्लक आहेत. सरकारकडून दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment