‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आजपासून सुरु, स्थलांतरितांना मिळणार दिलासा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. ठिकठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतत आहेत.  आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अशा गरीब तसेच स्थलांतरित कामगारांसाठी आशादायक गोष्ट घडली आहे. एक देश एक रेशन कार्ड ही योजना आजपासून देशभरात सर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश याठिकाणी सुरु होते आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही प्रदेशातील व्यक्ती इतर कोणत्याही प्रदेशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रास्त भाव रेशन दुकानातून अन्नधान्य खरेदी करू शकणार आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यात हा प्रकल्प राबविण्यात आला होता. या राज्यांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा होती. १ जानेवारीपासून आणखी ८ राज्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. आजपासून देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश इथे ही योजना राबविण्यात येणार आहे. बायोमेट्रिक किंवा आधार वैधतेनंतर नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशातील जवळपास ६७ कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच स्थलांतरित कामगारांना अनुदानित अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही.

देश के 83 फीसदी राशनकार्ड धारक 'वन ...

एक देश एक रेशन ही सध्याच्या केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिक कोणत्याही ठिकाणी रास्त भाव दुकानातून स्वस्त ऍन खरेदी करू शकणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार नागरिकांना रस्ट भाव दुकानातून गहू व तांदूळ स्वस्त दरात अर्थात अनुक्रमे २ व ३ रु प्रतिकिलो मिळतात. ही  योजना सुरु झाल्यावर जुने रेशन कार्ड सुरु राहील केवळ त्याला नवीन नियमानुसार अपडेट केले जाईल. केंद्र सरकारने राज्यांना दहा अंकांचे रेशन कार्ड क्रमांक जारी केले आहेत ज्यातील पहिले दोन क्रमांक राज्याचे कोड असतील आणि त्यानंतरचे दोन अंक रेशन कार्ड क्रमांक असतील. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास सरकारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment