मनपाकडून लॉकडाऊनमध्ये तब्बल एक कोटींची वसुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनाकडून संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्याचबरोबर कोरोनाचे संकट कमी होत असताना निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तथापि महापालिकेच्या मालमत्ता विभागाने लॉकडाऊनमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची वसुली केली. मालमत्तांचे भाडेकराराची नूतनीकरण, गाळ्यांचा लिलाव, जमीन भाडेपट्टा यातून चार महिन्यात ही वसुली झाली असल्याचे उपआयुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमूळे बाजारपेठेसह दुकाने दोन्ही नाट्यगृहे बंद ठेवण्यात आले होते. तरीही महापालिकेच्या मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे, भाड्यांच्या कराराचे नूतनीकरण, गाळ्यांचा लिलाव, आठवडी बाजार, पे अँड पार्किंग, जमीन भाडेपट्टा इत्यादी ठिकाणी वसुली केली. कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर कोणाचे नियम शिथिल करण्यात आले होते. यावेळी प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी उत्पन्नवाढीसाठी सूचना दिल्या होत्या.

चार महिन्यामध्ये तब्बल 1 कोटी 4 लाख 1873 रुपये वसुली करण्यात आली. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे 12 लाख 13 हजार 854 रुपये, जाहिरात फलक 38 हजार 477,पे अँड पार्किंग 34 लाख 39 हजार 700, दुकाने 4 लाख 70 हजार आणि आठवडी बाजार 29 हजार 540 रुपये, लिज चे 2 हजार रुपये, जमीन भाडेपट्टी, 27 लाख 26 हजार 981, कॉर्टर्स आणि वॉटर चे 23 लाख 40 हजार रुपये, आणि इतर 1 लाख 40 हजार 482, याप्रमाणे 1 कोटी 4 लाख 1 हजार 873 रुपये वसुल करण्यात आले आहे.

Leave a Comment