भारत आणि चीन एकमेकांच्या संधी, ते एकमेकांना धोका पोहोचवणार नाहीत – चीनी दूत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । भारत- चीनच्या सीमावादावर आता चीनच्या दूताने एक संदेश व्हिडीओ रूपात दिला आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंध खूप महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपण सध्या ज्या मुद्द्यावर वाद घालत आहोत त्या मुद्द्यांचा विचार करून आम्ही नेमका का वाद घालत आहोत ते बघा असे त्यांनी म्हंटले आहे. यामध्ये त्यांनी भारत आणि चीन एकमेकांच्या संधी आहेत. ते एकमेकांना कोणताच धोका पोहोचवणार नाहीत. असेही म्हंटले आहे.

त्यांनी म्हंटले आहे, ‘चीन आणि भारत एकत्र covid -१९ च्या विरोधात लढत आहेत. त्याचबरोबर सीमेच्या स्थितीवर देखील वाद घालत आहेत. मला आशा आहे कि दोन्ही देशातील तरुण भारत आणि चीन यांच्या नात्यामध्ये सुधारणा होण्याचे महत्व समजून घेतील. आपण एक एक लक्षात घेतली पाहिजे. की भारत आणि चीन एकमेकांच्या संधी आहेत. ते एकमेकांना कोणताच धोका पोहोचवणार नाहीत. आपण एकमेकांचा विकास योग्य मार्गाने पाहणे गरजेचे आहे. तुम्ही आमचे मतभेद योग्यरितीने पहा. आपण सहकार्याने हे मतभेद मिटवू शकतो. तसेच आपल्यातील रणनीतीपुर्वक परस्पर विश्वास वाढवू शकतो.

 

सन वेडोंग येथून हा व्हिडिओ चीनी दूताने पाठविला असून आता भारताकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे लवकरच कळेल. भारत चीनमधील वाद रोज नवनवी वळणे घेत आहे. युद्ध होऊ नये म्हणून अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. तर भारत-चीन मधील कमांडर्स मध्येही चर्चा होत असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment