अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय- जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय आहे आणि आम्ही ते तुमच्या मदतीने करणारच असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास ९ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात पोहोचली आहे त्यावेळी ते बोलत होते.

माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचं नाही. त्यांना जाऊन एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपलं नवीन संघटन इथं तयार व्हायला हवं होतं, असं मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मरगळ झटकून नव्याने पक्षाची बांधणी करा. असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत हवी ती मदत केली जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा. असेही ते म्हणाले. दरम्यान, विकासाच्या बाजूने उभा राहणारा मोठा गट रत्नागिरीमध्ये आहे. तसेच शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा लोक या भागात आहेत. लोकांनी आपल्या उभं राहण्यासाठी काम करा. मला खात्री आहे, की लोक आपल्या बाजूने उभं राहतील, असं राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी या संवाद यात्रेमध्ये म्हटलं आहे.

Leave a Comment