Saturday, December 20, 2025
Home Blog Page 7

Mahayuti MNC Election Formula : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला!! पहा कसं आहे जागावाटप

Mahayuti MNC Election Formula

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mahayuti MNC Election Formula। आगामी महाराष्ट्र महापालिका निवडणुकांसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. खरं तर महायुतीमध्ये सर्व काही ओके नाही अशा चर्चा मागच्या काही दिवसापासून विरोधकांकडून उठवल्या जात आहेत, शिंदे गट आणि भाजपमध्ये खास करून मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. परंतु आता तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपाचा तोडगा काढला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार- MNC Election Formula

महत्वाची बाब म्हणजे नागपूरमध्ये भाजपची ताकद जास्त असूनही मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा मोठेपणा भाजपकडून दाखवला जाणार आहे. दुसरीकडे सर्वांचं लक्ष्य असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त महत्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी जागावाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे Mahayuti MNC Election Formula. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यासाठी आग्रही आहे. भाजपकडून अंतिम फॉर्म्युला जाहीर झाला नसला तरी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. मुंबईत महायुतीसमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं आव्हान असेल. कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबईत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे त्याठिकाणी एकत्रित निवडणूक लढवणेच फायद्याचे असल्याची जाणीव भाजप हायकमांडला आहे.

याउलट, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मात्र त्यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद समान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने मुद्दाम स्वतंत्रपणे निवडणुक लढण्याची वेगळी रणनीती आखली आहे. जेणेकरून विरोधकांना त्याठिकाणी राजकीय स्पेस मिळू नये. नवी मुंबई महापालिकेसंदर्भात अजून तरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन लढण्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहेत असं बोललं जातंय.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 कधी देणार?? एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनादरम्यान आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत केली जाते, परंतु सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे २१०० रुपये कधी देणार असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभागृहात केला. यावर उत्तर देताना योग्य वेळ आली कि आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं मोघम उत्तर एकनाथ शिंदेनी दिले.

नेमकं काय घडले? Ladki Bahin Yojana

नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेतील त्रुटी वर बोट ठेवत सरकारला धारेवर धरले. लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, अशा शब्दात नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. तसेच २१०० रुपये तुम्ही देतो म्हणाला होता ते कधी देणार असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. Ladki Bahin Yojana

एकनाथ शिंदेच उत्तर

नाना पटोले यांच्या एकामागून एक प्रश्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. नानाभाऊ, तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलून नये. या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला. आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील. तसेच आता राहिला प्रश्न तो म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार?तर आम्ही योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभही देऊ, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी आजही सांगतो अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली.

Who Will Be Modi’s Successor : कोण असेल मोदींचा उत्तराधिकारी? मोहन भागवत यांचे उत्तर ऐकाच

Who Will Be Modi's Successor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Who Will Be Modi’s Successor। आज संपूर्ण देशात मोदींची हवा बघायला मिळतेय. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जिकडे तिकडे मोदी मोदी आणि फक्त मोदी .. मोदी म्हणजेच भाजप असं एकूण चित्र आहे. स्थानिक निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदींच्या नावावरच मते मागितली जातायत. नरेंद्र मोदी या नावावरच सध्याची भाजप यशाची चव चाखत आहे असं म्हंटल तरी ते चुकीचे ठरणार नाही. परंतु सध्या मोदींचे वय ७५ वर्ष आहे. अशावेळी त्यांच्यानंतर भाजपची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार? मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. आता खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) याना विचारलं असता त्यांनी अतिशय हुशारीने उत्तर दिले.

काय म्हणाले मोहन भागवत? Who Will Be Modi’s Successor

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दीनिमित्त चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आरएसएस प्रमुख मोहन भागवत याना मोदींच्या उत्तराधिकारी बाबत प्रश्न केला असता ते म्हणाले, कि याबाबत भाजप आणि मोदी आपापसात चर्चा करून निर्णय घेतील. भागवत यांनी हुशारी दाखवत कोणत्याही एका नेत्याचे नवा टाळलं. परंतु नेहमीच अशी चर्चा सुरु असते कि नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगु आदित्यनाथ, नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस त्यांची जागा घेऊ शकतात. Who Will Be Modi’s Successor

दरम्यान, याप्रसंगी मोहन भागवत यांनी तामिळनाडूमध्ये आरएसएसच्या मर्यादेवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की तामिळनाडूमध्ये १००% राष्ट्रवादी भावना आहे, परंतु काही कृत्रिम अडथळे या भावनेच्या पूर्ण अभिव्यक्तीमध्ये अडथळा आणत आहेत. हे कृत्रिम अडथळे फार काळ टिकणार नाहीत आणि आपण ते दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. तामिळनाडूचे लोक संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित आहेत आणि ही मूल्ये आणखी मजबूत करण्याची आवश्यकता आहे असेही मोहन भागवत यांनी म्हंटल. मोहन भागवत यांनी दक्षिण भारतीय राज्यांच्या संस्कृतीचे, विशेषतः त्यांच्या पारंपारिक पोशाखाचे, “वेष्टी” चे कौतुक केले, जे लोकांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतिबिंब आहे.

Sharad Sonawane : बिबट्याचा वेशात आमदार विधानभवनात!! जनसामान्यांच्या व्यथा सांगून टाकल्या

Sharad Sonawane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Sonawane लोकवस्तीवर आणि शेतात बिबट्याचा (Leopard) वावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बिबट्याने अनेकांचा जीव घेतल्याच्या घटना दररोज पाहायला मिळतायत. अनेकदा तर रात्रीच्या अंधारात बिबट्या इकडे तिकडे फटकताना दिसतोय. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात तर बिबट्याची मोठी दहशत आहे. खास करून पुणे आणि जुन्नर भागात बिबट्याने अक्षरशा धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच सध्या नागपुरात राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सुरु असून तिथेही बिबट्याचीच चर्चा सुरु आहेत. अशावेळी सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्यात या मागणीसह जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी अधिवेशनादरम्यान चक्क बिबट्याचा वेशात विधानभवनात प्रवेश केला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष्य वेधून घेतलं.

यावेळी शरद सोनावणे (Sharad Sonawane) म्हणाले, माझ्या विभागात ३ महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात ५५ बळी गेले होते. २०१४-१५ च्या अधिवेशनात हा धोका मी शासनाला सांगितला होता. हा मांजर कुळातील प्राणी शेड्यूल एकचा नसून शेड्यूल दोनचा आहे. पण त्यावेळी कोणी काही मनावर घेतले नाही. आजही बिबट्यांना पकडायचं सोडून सरकार महिलांना, शेतकऱ्यांना, मुलाबाळांना काटरे लोखंडी पट्टा मानेला लावण्याचा सल्ला देत आहे. आमची मुलं अंगणात नाही. रस्त्यावर दिसत नाही. शाळेमध्ये जात नाही. घराभोवती तारेचं कुंपण करुन त्यात करंट सोडून आम्हाला आता बसण्याची वेळ आली आहे. मला असं वाटतं की आता तरी त्यावर काहीतरी तोडगा काढावा.

2 रेस्क्यू सेंटर तयार करा- Sharad Sonawane

आपण मुंबईत फ्लॅटमध्ये राहत असल्यानं तुम्हाला ग्रामीण भागातील परिस्थिती, जनतेची अडचण माहित नाही. ऊस पट्ट्यात हजारोंच्या माणूस मेल्यावर २५ लाख दिले जातात. माणसाची किंमत २५ लाख होऊ शकत नाही. आम्हाला पैसा नको. तर शासनाने या समस्येची दखल घेऊन दोन रेस्क्यू सेंटर बनवावेत. दोन हजार बिबटे राहतील असं रेस्क्यू सेंटर येत्या तीन महिन्यात तयार करा. एक हजार मादी बिबट्या, नर बिबट्या वेगळे करा. त्यामुळे नसबंदीचा विषय मिटेल. एक सेंटर जुन्नर मध्ये आणि दुसरे सेंटर अहिल्यानगरमध्ये असावे. अशी मागणी त्यांनी केली. इथून पुढं बिबट्यामुळं एकही बळी सामान्य जनतेला मान्य नाही आणि असा एकही बळी जात असेल तर त्याला आपण सगळे, सरकार जबाबदार आहे असं म्हणत शरद सोनावणे यांनी बिबटया हल्लयाचे गांभीर्य समजवून सांगितलं.

Shiroda Beach Tourism : रशियन पर्यटकांनाही भुरळ घालतोय कोकणातील हा बीच; डिसेंबरमध्ये असते मोठी गर्दी

Shiroda Beach Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shiroda Beach Tourism । डिसेंबर महिना म्हंटल कि सुट्यांचा महिना… वेगवगळ्या कंपन्यात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचा वर्षभराच्या सुट्ट्या शिल्लक असल्याने फिरण्याचा प्लॅन तर ते आखतातच.. थंडीच्या दिवसांत ट्रिप काढण्याचा आणखी एक फायदा म्हणजे निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. सकासकाळची धुक्याची चादर, अन त्यातून वाट काढत केलेला प्रवास यांचं फील जरा वेगळंच असते. त्यातहि या दिवसात कोकणात जाणाऱ्यांची संख्याही तितकीच जास्त असते… कारण म्हणजे ख्रिसमस नाताळ आणि नव्या वर्षाची पार्टी… तुम्ही सुद्धा यंदाच्या डिसेंबर महिन्यात कुठेतरी कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका बीच बद्दल सांगणार आहोत ज्याची भूरळ फक्त भारतीयांनाच नव्हे तर अगदी रशियन पर्यटकांनाही आहे.

जलक्रीडांचा मनसोक्त अनुभव- Shiroda Beach Tourism

कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोडा बीचवर सध्या पर्यटकांची लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या विविधतेत हरवून जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हा बीच सर्वात बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतो. शिरोडा बीचवर जलक्रीडांचा अनुभव घेतला जाऊ शकतो. इथे बोटिंग, कायकिंग, आणि पॅडल बोटिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणावर पर्यटक दिसतात. इथले स्वच्छ पाणी, समुद्राच्या लाटा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतात. इतर प्रसिद्ध बीचच्या तुलनेत इथे गर्दी कमी असते. खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय सुद्धा याठिकाणी उत्तम आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, शिरोडा बीचवरील वाढत्या पर्यटकांमुळे परिसरातील होमस्टे, रिसॉर्ट्स आणि स्थानिक दुकानदारांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कोकणी पदार्थांवर मारा ताव –

शिरोडा बीच कोकणी संस्कृतीचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. इथल्या लोकांच्या परंपरा, कला आणि परंपरेची झलक इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला दिसते. इथे ताज्या मासळीचे पदार्थ, ओला नारळ घालून बनवलेल्या मसालेदार भाज्या, सोलकढी इत्यादी पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. कोकणी कढी, माशाचे रेजी, भात या सर्वांचा स्वाद इथे आनंदाने घेतला जातो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी शिरोडा बीचवर जाण्यासाठी सर्वात बेस्ट मानला जातो. Shiroda Beach Tourism

शिरोडा बीचला कसे जावे?

रस्त्याने (By Road)

शिरोडा बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे.

वेंगुर्ला शहरापासून अंतर : सुमारे 12–14 किमी

सावंतवाडीहून : 25–30 किमी

कोल्हापूर–गोवा महामार्ग (NH 66) वरून वेंगुर्ला व नंतर शिरोडा गावाकडे जाणारा मार्ग सोयीस्कर आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, गोवा येथून अनेक खासगी गाड्या व पर्यटन बसेस थेट किंवा वेंगुर्ल्यापर्यंत उपलब्ध आहेत.

रेल्वेने (By Train)

सर्वात जवळची रेल्वे स्थानके :

सावंतवाडी रोड (SWV) – सुमारे 25–28 किमी

कुडाळ (KUDL) – सुमारे 35–40 किमी

दोन्ही स्थानकांवरून टॅक्सी, ऑटो किंवा बसने शिरोडा बीचपर्यंत सहज पोहोचता येते.

Pune Nagpur Special Train : पुणे- नागपूर स्पेशल ट्रेन!! कधी आणि कुठून धावणार?

Pune Nagpur Special Train (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nagpur Special Train । पुण्यावरून विदर्भांत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. खरं तर सध्याच्या हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण सुट्ट्यांचा प्लॅन आखतात. त्यातच २५ डिसेंबरला ख्रिसमस नाताल आणि नंतर नवीन वर्षाचं स्वागत असल्याने रेल्वेवर अतिरिक्त ताण हा येणारच, हा विचार डोक्यात ठेऊन रेल्वे विभागाने मुंबई आणि पुण्याहून नागपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या जाहीर केल्या आहेत. या ट्रेन मुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल असा विश्वास रेल्वे विभागाला आहे. अशावेळी पुणे- नागपुर ट्रेनचे वेळापत्रक आज आपण जाणून घेऊया. तसेच हि ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबेल ते सुद्धा पाहुयात.

कसे असेल रेल्वेचे वेळापत्रक? Pune Nagpur Special Train

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल.या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील.ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Pune Nagpur Special Train

कशी असेल ट्रेनची रचना –

या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार –

पुणे ते नागपूर स्पेशल ट्रेनला महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामध्ये दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. सणासुदीच्या कालावधीत नागपूर–पुणे मार्गावरील तिकिटे सहसा लवकर संपतात. अशा वेळी विशेष गाड्यांचे नियोजन केल्याने अतिरिक्त मागणी पूर्ण होण्यास मदत मिळेल. प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar : … तर घरी बसावं लागेल; फडणवीसांनी भाजपच्याच आमदाराला झापलं

Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar : महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज अनोखी गोष्ट बघायला मिळाली. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच आमदाराला झाप झाप झापलं विषय होता दारू बंदीचा, पण तो पोचला थेट लाडक्या बहिणींपर्यंत…. लाडक्या बहिणांना मध्ये घेतलं आणि देवेंद्र फडणवीसांचा पारा चढला. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच आमदाराला ठणकावून सांगितलं. सभागृहात नेमकं काय घडलं तेच थोडक्यात समजून घेऊया.

फडणवीसांनी कोणाला झापलं ? Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar

ज्या आमदाराला देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात सर्वांसमोर झापलं त्या आमदाराचे नाव आहे अभिमन्यू पवार, ते औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. एवढच नव्हे तर ते खुद्द फडणविसांचे माजी स्वीय सहाय्यक होते. अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अवैध दारुचा मुद्दा मांडला. मागच्या सरकारमध्ये आणि आता अशा दोन लक्षवेधी मांडल्या. तुमच्या दालनात ३ बैठका झाल्या. पण अजूनही याबाबत कारवाई झालेली नाही. हा सामाजिक विषय असून, प्रत्येक आमदाराचा आहे. ग्रामीण भागातील आमदारांना रोज त्रास होत आहे. कुठेही गेलो तरी आम्हाला अवैध दारुबद्दल विचारतात. आपण लाडक्या बहिणी म्हणतो, पण लाडक्या बहिणीचं काही दु:ख असेल तर अवैध दारुवर आळा घालण्याचं दु:ख आहे असं अभिमन्यू पवार यांनी म्हंटल .

फडणवीस संतापले –

अभिमन्यू पवार यांनी दारूच्या विषयात लाडक्या बहिणींना मध्ये आणल्याने एक प्रकारे सरकारचीच कोंडी झाली, त्यामुळे फडणवीस हे आक्रमक झाले (Devendra Fadnavis Angry On Abhimanyu Pawar). मी परत सांगतोय की प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल. लाडकी बहीणचे पैसे सुरुच राहतील, ही योजना सुरुच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनेशी तुलना करता येत नाही. अध्यक्षांनी दिलेले निर्देश अंमलात आले नसतील तर आता लगेच अंमलबजावणी केली जाईल. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Special Trains For Christmas : ख्रिसमसनिमित्त मुंबई, नागपूर, पुण्यासाठी विशेष ट्रेन; पहा संपूर्ण वेळापत्रक

Special Trains From Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Special Trains For Christmas : आगामी ख्रिसमस नाताळ आणि हिवाळी सुट्टीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे कडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ते नागपूर आणि पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहेत. प्रवाशांना या काळात आरामदायी प्रवास करता यावा, त्यांना गर्दीला सामोरे जावं लागू नये यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आज आपण या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत.

मुंबई नागपुर रेल्वे – Special Trains For Christmas

गाडी क्रमांक ०१००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शनिवारी सीएसएमटीहून रात्री ००.३० वाजता निघेल आणि दुपारी २ वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन गाडी क्रमांक ०१००६ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून ०७.२० वाजता निघेल आणि सीएसएमटीला १८.५० वाजता पोहोचेल. या ट्रेन मध्ये ०२ सेकंड एसी, ०८ थर्ड एसी, ०६ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम- लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. मुंबई ते नागपूर ट्रेन दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही गाडी १२ डिसेंबर, २७ डिसेंबर २०२५ आणि ३ जानेवारी २०२६ रोजी सीएसएमटीहून आणि १३ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Special Trains For Christmas

पुणे- नागपूर -पुणे

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल. या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. हि विशेष ट्रेन दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल.

Mumbai To Nashik Local Train : मुंबई लोकल ट्रेन थेट नाशिकपर्यंत धावणार? नव्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai To Nashik Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Nashik Local Train । नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि यामुळे भविष्यात मुंबई ते नाशिक या दरम्यान लोकल धावू शकते अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे मार्ग उभारण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नाशिक-मुंबई लोकल ट्रेन आणि अनेक नवीन सेवा सुरू करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या “स्लॉट अनुपलब्धता” या दीर्घकाळाच्या समस्येचे अखेर निराकरण होईल.

131 किलोमीटरचा रेल्वेमार्ग – Mumbai To Nashik Local Train

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या रेल्वेमार्गासाठी सतत पाठपुरावा केला. नाशिक-मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी तसेच नवीन एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु रेल्वे प्रशासनाने सातत्याने “स्लॉटची उपलब्धता नसणे” हे प्राथमिक आव्हान म्हणून अधोरेखित केले. परंतु आता सुमारे 131 किलोमीटरच्या या मार्गांवर दोन नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या औपचारिक मंजुरीमुळे आता नाशिक-कसारा लोकल सेवा सुरु होण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. यानंतर प्रकल्पाच्या संदर्भातील परिस्थितीचा सखोल अभ्यास केल्यानंतर, खासदार राजाभाऊ वाजे अपुरी रेल्वे लाईन क्षमता हेच यामागील खरे मूळ कारण असल्याचे ओळखले . Mumbai To Nashik Local Train

मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई मार्गांच्या मंजुरीमुळे, नाशिक-मुंबई लोकल प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा सार्वजनिक-केंद्रित प्रकल्प आता अंमलबजावणीच्या जवळ येत आहे. नाशिक-कसारा दरम्यान दोन नवीन रेल्वेलाईन टाकण्यास मंजुरी मिळाल्याने नाशिकहून कसारा आणि कसाऱ्याहून मुंबई किंवा थेट नाशिकहून मुंबई अशी लोकल सेवा सुरु होईल या शक्यतेला बळ मिळालं आहे.

अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा! बाबा आढाव यांच्यासाठी राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

RAJ THACKERAY BABA ADHAV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं काल रात्री निधन झाले. बाबा आढव हे कष्टकरी आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जात होते. काल वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. बाबा आढाव यांच्यासारखी माणसे पुन्हा घडावीत हीच इच्छा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.

काय म्हणाले राज ठाकरे ?

ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकार्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला ‘गिग वर्कर’ म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत.

बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा.
बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।