पाकिस्तान गेला धोकादायक मार्गाच्या पलीकडे, भारताला वाचवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाकिस्तानदेखील प्रयत्न करीत आहे, परंतु पाकिस्तानचे सर्व प्रयत्न कोसळले आणि पाकिस्तानने धोक्याची रेषा ओलांडली.

२५ मार्च २०२० रोजी पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या १०२२ पर्यंत पोहोचली आहे आणि आजही सुमारे १०० रूग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे, तेथे चाचणीची चांगली सुविधादेखील नाही, म्हणून तेथिल रूग्णांची खरी संख्या समोर आलेली नाहीये, कोरोना संक्रमित हजारो रुग्ण आहेत पण त्यांची नीट तपासणी होत नाही आहे.

१००० संसर्ग ही पाकिस्तानने ओलांडलेली रेखा धोकादायक मानली जाते आणि आता तिथे काहीही घडू शकते, आता जगाचे भारताकडे लक्ष आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु तरीही भारतात कोरोनाने संक्रमित ६०६ रुग्ण आढळले आहेत, पाकिस्तान जवळजवळ दुप्पटीने पुढे आहे, जर भारत १००० पूर्वी थांबला तर भारताचा धोका टळेल. परंतु जर भारतात संक्रमित रूग्णांची संख्या १०००च्या वर पोहोचली तर भारतही धोक्यात येईल.

भारताला धोक्यापासून वाचवण्यासाठी जनतेवरच भरवसा आहे, जर लोकांनी लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले तरच भारत उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल, परंतु जर जनतेने दुर्लक्ष केले आणि लोक घराबाहेर गेले आणि नकळत संक्रमित लोकांना भेटले तर ते देखील आजारी पडतील. जर हे असेच चालू राहिले तर कोणीही भारताला धोक्यातून वाचवू शकणार नाही.

Leave a Comment