सामान्य माणसाला बसणार मोठा धक्का ! ‘यामुळे’ होऊ शकतात जीवनावश्यक वस्तू महाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्रकची मालवाहतूक ही 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. डिझेलची किंमतीत झालेली वाढ हे त्यामागील कारण आहे. असे झाल्यास त्याचा परिणाम महागाईवर स्पष्टपणे दिसून येईल. याचाच अर्थ असा कि आता टोमॅटो नंतर, इतर भाज्यांसह दररोजच्या वापरातील वस्तूच्या किंमती देखील वाढू शकतात. ट्रक चालक संघटनेने याबाबत असे म्हटले आहे की, जर दररोज इंधनाचे दर वाढतच राहिले तर भाडे हे 20 टक्क्यांनी वाढवावे लागेल. युनियनने दरमहा किंवा तिमाहीत डिझेलच्या किंमतींचा आढावा घेण्याची मागणीही केली आहे.

फळे, भाज्या, एफएमसीजी वस्तू महाग होऊ शकतात – मालवाहतूक वाढल्यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे दर वाढणे साहजिकच आहे. त्याचबरोबर एफएमसीजी वस्तूंच्या किंमतीही वाढू शकतात. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालवाहतुकीच्या वाढीचा परिणाम संपूर्ण देशात एकाच वेळी दिसून येईल.

यामुळे एफएमसीजी कंपन्यांवरील दबाव वाढेल आणि त्यांना किंमती वाढविण्यास भाग पडेल. फळ आणि भाजीपाल्याच्या किंमतींमध्ये वाहतुकीचा वाटा इतर वस्तूंच्या तुलनेत जास्त आहे. वास्तविक, वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी असते.

आपल्या उत्पादनाला बाजारात आणण्यासाठी त्यांना मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. फळांच्या बाबतीत हि परिस्थिती काहीशी वेगळी आहे. वेगवेगळ्या राज्यातून फळं दिल्लीत आणली जातात. यानंतर, त्यांचे वितरण संपूर्ण देशात केले जाते. अशा परिस्थितीत मालवाहतूकिचा खर्च वाढला की फळांच्या किंमतींमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत टोमॅटो 10-15 रुपयांना विकला जात होता. त्याचबरोबर आता ते प्रति किलो 80-100 रुपयांवर गेले आहे. इतकेच नाही तर इतर हिरव्या भाज्या आणि बटाटेदेखील त्याच प्रमाणे सुरू झाले आहेत.

मालवाहतूकीत होऊ शकते 20 टक्क्यांनी वाढ
ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस (एआयएमटीसी) चे माजी अध्यक्ष आणि कोअर कमिटीचे अध्यक्ष बाळ मलकीत सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, मागणी आधीच कमी आहे आणि जवळपास 55 टक्के वाहने उभी आहेत. अशा परिस्थितीत हे सुरू ठेवणे अवघड आहे. कारण कोरोना विषाणूमुळे सुरु केलेले लॉकडाउन परिवहन क्षेत्राचे नुकसान करीत आहे.

ते म्हणाले की, अशा परिस्थितीत ट्रकचे कामकाज टिकविण्यासाठी आज नाही तर उद्या भाडेवाढ निश्चितच करावी लागेल. ते म्हणाले की, ही किंमत त्यांच्यापुढे ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. सिंग म्हणाले की, हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी यावेळी मालवाहतुकीत 20 टक्के वाढ होणे आवश्यकच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment