आजपासून पितृपक्षाला सुरूवात! जाणून घ्या श्राद्ध तिथी आणि विधीची क्रिया

pitrupaksh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. पितृपक्षाला श्राद्धपक्ष आणि महालय असे देखील म्हणतात. पितृपक्षाच्या कालावधीत श्राद्धविधी केले जातात. तसेच, कुटुंबातील देवता, पूर्वज आणि पितरांबद्दलचा आदर व्यक्त केला जातो. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, श्राद्ध पक्षाच्या वेळी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या नावाने केलेला प्रसाद ग्रहण करतात. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्ष भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. आज आपण याच पितृ पक्षाच्या तिथीविषयी आणि विधीविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पितृपक्ष तिथी

आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होत आहे. प्रतिपदा तिथी ही आज दुपारी 3:26 पासून ते 30 सप्टेंबरच्या दुपारी 12:21 पर्यंत सुरू असेल. त्याचबरोबर, पक्षाचा कुतुप मुहूर्त 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज रात्री 11:47 ते 12:35 पर्यंत असेल. रोहीण मुहूर्त हा आज दुपारी 12:35 ते 1:23 पर्यंत असेल.

पितरांचे स्मरण कसे करावे?

पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांसाठी नियमित जल अर्पण केले पाहिजे. ते जल तर्पण दुपारी दक्षिण दिशेला तोंड करूनच दिले पाहिजे. काळे तीळ देखील पाण्यात मिसळून ते पाणी भाताच्या पिंडावर सोडतात. यानंतर, मृत्यूच्या दिवशी अन्न आणि वस्त्रांचे दान करावे. तसेच गरीब व्यक्तीला अन्नदान करावे. यानंतर पितृ पक्षाचे कार्य संपते.

पितृ पक्षात कोणते उपाय करावेत?

पितृपक्षाच्या काळात घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे. पितृ पक्षाच्या काळात ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केल्यास फलदायी ठरते. श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांत केस व नखे कापू नयेत. श्राद्धविधीची क्रिया नेहमी दिवसा करावी. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. तसेच, या दिवसात प्राणी किंवा पक्षांना त्रास देऊ नये.