PM KISAN SCHEME : खुशखबर!! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN योजना) अंतर्गत केंद्र सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जर तुम्ही देखील त्यापैकीच एक असाल तर हे लक्षात घ्या की, सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

पीएम किसानचा हप्ता ‘या’ महिन्यांत येतो
प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन देखील करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होतो ?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आता सरकारने जमिनीची मर्यादा रद्द केली आहे. मात्र जर कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधीमधून बाहेर ठेवले जाते. वकील, डॉक्टर, सीए आदीही या योजनेतून बाहेर पडले आहेत.

‘या’ चुकांमुळे अडकतात पैसे
काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते.

Leave a Comment