हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana । देशभरातील बळीराजा पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. खरं तर यापूर्वी फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले होते. त्यानंतर ४ महिने उलटूनही पीएम किसान योजनेचं पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. मात्र आता पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, येत्या २ ऑगस्टल पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर असतील आणि या काळात ते उत्तर प्रदेशला १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देतील. याच कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan Yojana) वितरित करू शकतात. यापूर्वी २० जुलैला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होतील असं बोललं जात होते. मात्र त्यावेळी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. आता मात्र बळीराजा २००० रुपयांकडे मोठ्या आशेने बघत आहे.
सही जवाब-
— Agriculture INDIA (@AgriGoI) July 28, 2025
A) कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-KISAN) एक केंद्रीय योजना है, जिसे 24 फरवरी 2019 को शुरू किया गया था। इस योजना का उद्देश्य खेती योग्य भूमि रखने वाले किसान परिवारों की वित्तीय आवश्यकताओं को पूरा करना है। इसके अंतर्गत देशभर के किसानों… pic.twitter.com/u1ZvV24nrI
सरकारनं ट्विट काय केलं ? PM Kisan Yojana
केंद्र सरकारने या योजनेबद्दलच ट्विट केलं आहे. कृषी मंत्रालयाने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) ही एक केंद्रीय योजना आहे, जी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचे उद्दिष्ट शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आहे. याअंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹ 6,000/- ची आर्थिक मदत दिली जाते, जी DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.




