भारत-चीन तणाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला हिंसक संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळं चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सीमेवर एकूणच युद्ध सदृश परिस्थिती आहे. देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

येत्या १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या टि्वटर हँडलवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. अजूनही चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले असल्याचे म्हटलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment