विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांना गमवावा लागला होता जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने 108 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषि शर्माला बुलंदशहर बॉर्डरवरुन रविवारी सकाळी अटक केली. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. या अगोदर शनिवारी 25 हजारांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर, भाजप नेता ऋषि शर्माचे अवैध फार्म हाऊस जेसीबीच्या सहाय्याने उद्धवस्त करण्यात आले होते.

विषारी दारुमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणाचा तपास चालू असताना माफियांनी कारवाईच्या भीतीनं विषारी दारु कालव्यात ओतून दिली. यानंतर जवां कालव्यातील विषारी दारु प्यायल्याने 10 कामगारांचा मृत्यू झाला. तर, अकराबादमध्ये शेखा कालव्यात मिळालेली दारु प्यायल्याने अनेक कामगारांची प्रकृती बिघडली. तर शनिवारी बिहारमधील पाच कामगारांचा जेएन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

शनिवारी प्रशासनाने विषारी दारु प्रकरणात फरार असलेला आरोपी भाजप नेता बीडीसी ऋषि शर्मा याच्या जवां ठाण्याच्या क्षेत्रातील फार्महाऊसवर जेसेबीच्या सहाय्याने कारवाई केली. एसडीएम कोल रंजीत सिंह यांच्या नेतृत्वाखालील टीमकडून हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणी केलेल्या तपासात या फार्महाऊसचा काही भाग सरकारी जमिनीवर असल्याचे समोर आले होते. जवां आणि अकराबाद क्षेत्रात कॅनोलमध्ये वाहून आलेली अवैध दारू प्यायल्याने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर वरच्या गंगा कालव्याची साफसफाई करण्याबरोबरच पाटबंधारे विभाग अवैध दारू शोधून नष्ट करण्यासाठी दोन दिवस हा कालवा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. हा कालवा बंद करून साफसफाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment