हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरातील लघु उद्योजक, फेरीवाले आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने (Central Government) पंतप्रधान स्वानिधी योजना (PM Swanidhi Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त आधार कार्डच्या (Adhar Card) आधारे 80,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे, हे कर्ज विनातारण व कमी व्याजदरावर दिले जाते. त्यामुळे आज आपण या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
किती कर्ज मिळते?
ही योजना विशेषत फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. या योजेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10,000 चे कर्ज दिले जाते. हे वेळेवर परतफेड केल्यास दुसऱ्या टप्प्यात ₹20,000 पर्यंत कर्ज घेता येते. दुसरे कर्जही नियमित फेडल्यास तिसऱ्या टप्प्यात 50,000 पर्यंत कर्ज मिळते.
कर्जासाठी कोणतीही हमी नाही!
या योजनेतील खास बाब म्हणजे, कर्जासाठी कोणत्याही प्रकारची तारण किंवा गॅरंटी आवश्यक नाही. हे कर्ज एका वर्षाच्या कालावधीत परतफेड करावे लागते. सरकारकडून या कर्जावर व्याज अनुदानही (सबसिडी) दिले जाते, त्यामुळे हे कर्ज घेणे अत्यंत सोयीस्कर ठरते.
फक्त आधार कार्ड आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत किंवा मान्यताप्राप्त वित्तीय संस्थेत अर्ज करता येतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर थेट कर्जाची रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. त्यामुळेच पंतप्रधान स्वानिधी योजना छोटे व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा वाढवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.




