म्हणून सरकारने गडकोट विक्रीला काढले : प्रकाश आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी |  राज्य सरकारच्या गडकोट भाड्याने देण्याच्या निर्णयाचा विरोधक आणि सोशल मिडीयाने देखील निषेद केला आहे. त्याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी देखील तोंडसुख घेतले आहे. त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करताना सरकारला दारुड्याची उपमा दिली आहे.

‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. म्हणून आता त्यांनी गडकिल्ले विकायला काढले आहेत,’ अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान एमआयएम आणि वंचित आघाडी युती बाबत देखील आंबेडकरांनी भाष्य केले आहे. ओवेसी जोपर्यंत युतीबाबत भाष्य करत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम आहे असे समजा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जागा वाटपावरून मतभेद झाले आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्याशी कसलीही चर्चा नकरता जलील यांनी वंचित सोबत असणारी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एमआयएम राज्यात ९८ जागांची मागणी करत आहे. तर तेवढ्या जागा सोडण्यास प्रकाश आंबेडकर तयार नाहीत. त्यामुळे जलील आणि आंबेडकर त्यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.

Leave a Comment