“भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावं”; प्रकाश आंबेडकर यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस असून त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान अजूनही विध्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याणी भाजपवर टीका केली आहे. “भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावे. युक्रेनमधून भारतीयांना आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहार, असे आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या युक्रेनमध्ये भारतीय विध्यार्थी अडकले आहेत. त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र, मिशन गंगा या मोहिमेत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. वास्तविक पाहता भाजपकडे कुठलीही फॉरेन पॉलिसी नाही. इतर देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी महिनाभर प्रयत्न केले, पण भारत सरकारने ती पाऊल उचलले नाहीत. आणि आता भारतीय विध्यार्थ्यांना मायदेशी आणले जात आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि केंद्र सरकावर गंभीर आरोप केला. भाजपकडून धार्मिक राजकारण केले जात असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली. त्याच्या टीकेला. आता भाजप नेते काय उत्तर देणार याकडे पहावे लागेल.

Leave a Comment