हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik High Speed Railway । मागील अनेक दिवसापासून चर्चेत असणारा पुणे – नाशिक रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या रेल्वे मार्गात आता बदल करण्यात आला आहे. महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणारा हा रेल्वेमार्ग पुण्याहून अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे नाशिकला पोहोचेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना याबाबत माहिती दिली. त्यामुळे या रेल्वेचा अहिल्यानगर आणि साईभक्तांना सुद्धा मोठा फायदा होताना दिसेल.
आधीच्या प्रस्तावानुसार, पुणे – नाशिक रेल्वे कॉरिडॉरचा (Pune Nashik High Speed Railway) प्रस्तावित मार्ग नारायणगाव मार्गे होता, मात्र याच ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे* (NCRA) यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वेधशाळा उभारली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने म्हटल्याप्रमाणे हा मार्ग व्यवहार्य नव्हता, वेधशाळेजवळून जाणारा रेल्वे मार्ग निरीक्षणांमध्ये अडथळा निर्माण करेल असे बोललं जात होत. या गंभीर कारणांमुळेच, वेधशाळेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला आहे.
कसा असेल नवीन मार्ग ? Pune Nashik High Speed Railway
महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, रेल्वेने पर्यायी मार्ग प्रस्तावित केला आहे. ज्यामधून GMRTवेधशाळेला वगळण्यात आलं आहे. नवीन मार्ग नाशिक → साईनगर शिर्डी → पुणतांबा → निंबळक → अहिल्यानगर → पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीद्वारे).असा असेल. यातील नाशिक रोड आणि साईनगर शिर्डी दरम्यानच्या मार्गांच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार आहे. साईनगर शिर्डी-पुणतांबा मार्ग (१७ किमी) दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी २४० कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. ८० किमी पुणतांबा-निंबळक मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. ६ किमी निंबळक-अहिल्यानगर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. तर चाकण औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या अहिल्यानगर आणि पुणे (१३३ किमी) दरम्यानच्या नवीन दुहेरी मार्गांसाठी ८९७० कोटी रुपयांचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.
काय फायदे होणार :
या नव्या रेल्वे मार्गामुळे तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. देशातील सर्वात प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या साईनगर शिर्डी आणि पेशवे राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहर पुणेशी जोडले जाईल . शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मार्गावरील धार्मिक पर्यटन वाढले.




