‘टाळ्या वाजवण्याऐवजी त्वरित पावले उचला!’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवत कौतुक करण्याचं आवाहनही मोदींनी केलं.

याच विनंतीवरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावत करोनामुळं उद्भवलेल्या आर्थिक संकटाकडे लक्ष वेधलं. ”कोरोना व्हायरसच संकट आपल्या नाजूक अर्थव्यस्थेवरील मोठा प्रहार आहे. यामुळं छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजदूर यांना फटका बसला आहे. टाळ्या वाजवून त्यांना मदत मिळणार नाही आहे. आज रोख मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्ज परतफेडीवर स्थगितीसारख्या मोठ्या आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. त्वरित पावले उचला!” राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास ३,७०० रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास तब्बल १ हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक लोकांनी घरात रहावं यासाठी मुंबई मेट्रोनेही रविवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल शट डाऊन करण्याचा विचार करत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment