‘चौकीदार चोर है’ वरून राहुल गांधी यांचा सर्वोच्च न्यायालयात माफीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |‘चौकीदार चोर है’ या कॉंग्रेसच्या नाऱ्याबाबत राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात स्प्ष्टीक्र्ण द्यावे लागले आहे. भाजपच्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या मानहानी च्या दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राहुल गांधी यांनी आपला माफी नामा सादर केला आहे.

 

मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. त्या आधी या संदर्भात राहुल गांधी  यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावर राहुल गांधी यांनी आपले स्पष्टीकरण  दिले आहे.

कोणाची मानहानी करण्याचा आपला उद्देश नव्हता. मात्र निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान आपल्या तोंडून हे वाक्य ओघात येवून गेले आहे. या बद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो असे  राहुल गांधी यांनी म्हणले आहे.

Leave a Comment