राहुल गांधींची जर्मनीतील लोकांना भावनिक साद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅम्बुर्ग, जर्मनी |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील लोकांशी संवाद साधताना त्यांनी काही भावनिक मुद्द्यांना हात घातला. सोबतच समकालीन भारतीय राजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टींवर मुक्तपणे मतही मांडलं.

ब्युकेरीअस समर स्कुलच्या कॅम्पणगेल सभागृहात परदेशी भारतीयांच्या सभेत ते बोलत होते. अहिंसा हे भारतीयत्वाचं प्रतिक अन तत्वज्ञान आहे. प्रधानमंत्री माझ्याबाबत विद्वेषक बोलतात. पण माझ्या पक्षातील कुणी जरी असं करत असेल तरी त्याला माझा विरोध असतो. माझी आजी व वडील दोघेही हिंसेचा शिकार ठरले, यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता विसरुन जाणं आणि क्षमा करणं. यातून आम्ही बाहेर पडलो त्यामुळे देशभक्ती व त्याग आम्हालाही माहीत आहेच.

अविश्वास ठरवावेळी मोदींच्या गळाभेटीच स्पष्टीकरण देताना, एखादी व्यक्ती तुमचा राग करत असेल आणि तुम्हीदेखील त्याला रागानेच उत्तर देत असाल तर ते मूर्खपणाच आहे. तुम्ही काय उत्तर देणार याच्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असणं गरजेचं आहे. भारतात महिलांवरील अत्याचाराच प्रमाण वाढत आहे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारतीय पुरुषांनी शिकून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी पुरुष स्त्रीला समान न्यायाने वागवतील आणि आदर करतील त्याचवेळी हे शक्य असल्याचं राहुल गांधी पुढे म्हणाले.

Leave a Comment