कुणाचाही सरकार येऊ द्या, फक्त भाजपचे नको!- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । राज्यात अजूनही सरकार स्थापन होताना दिसत नाही आहे. मात्र, भाजपला राज्यात विरोधी बाकावर बसविण्याच्या पक्का निर्धार शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने केला असताना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवा असं विधान केला आहे.

भाजपा सोडून कोणाचीही सत्ता येऊ द्या, फक्त भाजपाची नको असा आशावाद शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. तसेच देवेंद्र फडणवीस पुन्हा नागपूरला जातील असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे. किमान समान वाटपाच्या कार्यक्रमानंतर शेतकरी स्वाभिमानी पक्ष आपली भूमिका ठरवेल असही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment