सोळा संसार सांभाळणार्‍यांना शिव्या घातल्याशिवाय मला झोप लागत नाही – ना.रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सोळा संसार सांभाळणार्यांना मला शिव्या घातल्या शिवाय झोप लागत नाही. दूध डेअरी विकणार्यांनी आणी ज्यांना पाण्यातल काही कळंत नाही मी मंत्री पदासाठी पाणी विकले असे शिकवू नये तर पक्ष सोडुन जाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी बघुन माझ युट्युबही रडल त्यांच्या अभिनया बद्दल त्यांना आँस्कर पेक्षा महाआँस्कर द्यावा अशी बोचरी टिका छत्रपती उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर करीत विधानसभेसाठी पुढील निर्णय दोन दिवसात जाहिर करु असे प्रतिपादन नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथे राजे गटाच्यावतीने आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, महानंदाचे उपाध्यक्ष डि के पवार, नगरसेवीका सुभद्राराजे नाईक निंबाळकर आदी माण्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, पुर्वीही राजकीय मंडळी राजकारण करत होते मात्र सर्वसामान्य लोक आहे तिथंच राहत होते,1991 ला श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला राजकारणात आणले आम्हाला सांगितले की हा तालुका तुम्हाला सांभाळावा लागेल,तेव्हा आम्ही ठरवले की कधीही भांडणार नाही आज रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे अशी खंत व्यक्त करुन रामराजे म्हणाले, कंपनी ही नोकरी साठी आणायची असते,दूध डेअरी ही दुध उत्पादक शेतकरी यांना दर देण्यासाठी काढायची असते, माणचे आमदार हे टीका करतात की काय केले ? दूध डेअरी काढली ती कशी काढली हे सर्व माहिती आहे, मागील पाच वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेलेत त्यांनी 80 कोटी रुपयांची कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे.

सभापती पद हे कंपाऊंड च्या आत आहे. मला पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही. परंतू चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे. जिल्हा व तालुका व मला सुखरूप ठेवायचे असेल तर आपल्याला चूक करून चालणार नाही, विकृत माणसं एकत्र येतात तेव्हा आपल्याला एकत्र राहावे लागणार आहे. आमचं राजकारण त्यागाचं राजकारण आहे. गेली 30 वर्षे अविरत कष्ट केले आहे. काही जणांना रामराजेंना शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही,हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे,त्यांना पाण्यातल काही कळत नाही, ह्यांच्या हातात जर हा जिल्हा दिला तर त्यांना एक वर्ष पण 11 तालुके संपवायला लागणार नाहीत अशी भितीही रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंची लढत “या” दिग्गज उमेदवारासोबत?

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

उदयनराजेंना आॅस्कर दिला पाहिजे - रामराजे निंबाळकर

Leave a Comment