RBI Big Decision | चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! RBI ने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI Big Decision | बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक चेकने पेमेंट करतात, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चेक आणि कॅश या दोन्ही पद्धतीने व्यवहार करणे खूप कमी झालेले आहे. सध्या ऑनलाईन पेमेंटमुळे या गोष्टी अत्यंत जलद आणि सोप्या झालेल्या आहेत. डिजिटल इंडिया करण्याचे मोदींचे स्वप्न हे साकार होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कॅश आणि चेकने व्यवहार करणे अत्यंत दुर्मिळ झालेले आहे. परंतु ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा देखील उपयोग होत आहे.

आजकाल गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करून सर्वसामान्य लोकांना अगदी सहजपणे पैशांचा व्यवहार देखील करता येत आहे. यामुळे पैसे पाठवणे आणि पैसे स्वीकारणे खूपच सोपे आणि जलद झालेले आहे. अगदी भारतातील कुठल्याही ठिकाणी असताना व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. परंतु व्यापारी लोक हे नेहमीच त्यांचे पेमेंट चेकने करत असतात.

त्याचप्रमाणे जेवढी रक्कम मोठी असते. त्याबाबतचे पेमेंट अनेक लोक चेकने करतात. ऑनलाइनमुळे चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या कमी झालेली असली, तरी मोठ्या कामासाठी चेकचा वापर केला जातो. रियल इस्टेट, शैक्षणिक संस्था, जमिनीचे व्यवहार व्यवसायांसाठी आजही चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

अशातच आता आरबीआयने (RBI Big Decision) चेकने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 6 ऑगस्ट पासून आरबीआयची पतधोरण समितीची बैठक सुरू होती. ही बैठक 6 ते 7 ऑगस्टपर्यंत झालेली आहे. या बैठकीत अनेकांच्या अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नक्की काय निर्णय घेतलेले आहेत. याकडे लोकांचे बारीक लक्ष आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये देखील बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

अशातच आरबीआयने (RBI Big Decision) एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.आता चेकने पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय आहे. चेक जमा झाल्यानंतर तो चेक झटपट क्लियर होणार आहे. आतापर्यंत बँकेत चेक जमा केल्यानंतर तो चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. परंतु आता अगदी काही तासातच हे चेकने केलेले पेमेंट क्लियर होणार आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पैशांच्या व्यवहार देखील अगदी जलद गतीने व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चेक देणाऱ्यांना आणि स्वीकारांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.