Real Estate : मुंबईच्या नजीक वाढतीये सेकंड होमची क्रेझ ; दिड वर्षात 200 कोटींपेक्षा जास्त व्यवहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Real Estate : पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एका निसर्गरम्य ठिकाणात क्वॅलिटी टाईम घालवणं पसंत करतात. आणि म्हणूनच मागच्या काही दिवसात सेकंड होम घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो आहे. एका आकडेवारीनुसार मागच्या दीड वर्षात अलिबाग लोणावळा कर्जत नेरळ मुरबाड पाचगणी अशा पर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार (Real Estate) झाल्याची माहिती आहे.

मुंबईच्या आसपास घर घेण्याकडे कल (Real Estate)

मुंबई पासून अलिबाग, लोणावळा, खंडाळा, कर्जत अशा ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अशा ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये मोठी बचत झाली आहे. शिवाय अटल सेतूची निर्मिती झाल्यामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास कमी वेळात करता येतो. या प्रवासात 40 मिनिटांची बचत होत आहे. त्यामुळे एका दिवसात वीकेंडसाठी इकडे जाण्याचा कल सुद्धा वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सेकंड होम (Real Estate) घेण्यासाठी लोक पुढे येत असल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत लोकांनी अपार्टमेन्ट सारख्या बिल्डिंगमध्ये घर घेण्यापेक्षा मोकळा भूखंड घेण्याला (Real Estate) अधिक पसंती दिली आहे. आपल्या मनाप्रमाणे घर बांधण्याचा ट्रेंड सध्या दिसून येत आहे.

सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश (Real Estate)

अभिनेता रणवीर सिंग, शाहरुख खान, दीपिका , विश्वविजेता संघाचा कप्तान रोहित शर्मा, विराट, कोहली, अनुष्का शर्मा, अमिताभ बच्चन अशा अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी गेल्या दोन वर्षात मुंबई नजीक अनेक ठिकाणी सेकंड होम आणि त्यासाठी भूखंड खरेदी (Real Estate) केले आहेत. सेकंड होम ची खरेदी केवळ श्रीमंतांकडूनच होत नाही. तर यापैकी बहुतांश ठिकाणी मुंबईतील नामांकित बिल्डर्सने इमारतींचे प्रकल्प देखील सादर केले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि उच्च माध्यम वर्गीय लोकांनाही अशा ठिकाणी फ्लॅट घेऊन स्वतःचे सेकंड होम चे स्वप्न साकारता येणार आहे.