दिलासादायक! आता आपली वीज कापली जाणार नाही, कोळसा मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ब्लॅकआऊटवर दिल्लीसह देशातील अनेक राज्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेदरम्यान केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. कोळसा मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले की, देशात वीजनिर्मिती संयंत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे. मंत्रालयाने कोळशाच्या कमतरतेमुळे वीज पुरवठा खंडित होण्याची भीती पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी असे वृत्त आले होते की, कोळशाच्या कमतरतेमुळे देशात विजेचे संकट येऊ शकते. यानंतर मंत्रालयाचे हे स्टेटमेंट समोर आले आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “कोळसा मंत्रालय आश्वासन देते की, देशाकडे उर्जा प्रकल्पाची गरज पूर्ण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा आहे. यामुळे, वीज संकटाची शक्यता पूर्णपणे चुकीची आहे. ”

कोल इंडियाकडे 4.3 कोटी टन साठा आहे
कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले, “देशातील कोळशाचे उत्पादन आणि पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला. मला प्रत्येकाला आश्वासन द्यायचे आहे की, वीज पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता नाही. कोल इंडियाच्या मुख्यालयात 4.3 कोटी टन कोळशाचा साठा आहे, जो 24 दिवसांच्या कोळशाच्या मागणीच्या बरोबरीचा आहे.”

कोळसा मंत्रालयाने सांगितले की,”पॉवर प्लांटमध्ये सुमारे 72 लाख टन कोळशाचा साठा आहे, जो चार दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियाकडे 400 लाख टन साठा आहे, जो वीज केंद्राला पुरवला जात आहे.”

सप्टेंबरपर्यंत कोळशावर आधारित वीज उत्पादन 24% वाढले
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, देशातील कोळशावर आधारित वीज निर्मिती या वर्षी सप्टेंबर पर्यंत 24 टक्क्यांनी वाढली आहे. पॉवर प्लांटला चांगला पुरवठा झाल्यामुळे उत्पादन वाढले आहे. पॉवर प्लांटला दररोज सरासरी 18.5 लाख टन कोळसा लागतो. दररोज 17.5 लाख टन कोळसा पुरवठा होतो.

Leave a Comment