Revas Bhaucha Dhakka | गणपतीसाठी बिनधास्त बोटीने जा गावाला ! रेवस भाऊचा धक्का 1 सप्टेंबरपासून सुरु

0
1
Revas Bhaucha Dhakka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Revas Bhaucha Dhakka | यंदा सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे ओसांडून वाहिली आहेत. तसेच समुद्राच्या पाण्याची पातळी देखील यावर्षी जास्त प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे समुद्रातून होणारे दळणवळण देखील बऱ्यापैकी कमी झालेले आहे. या पावसामध्ये रेवस भाऊचा धक्का या सागरी जलावरील बोटसेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद होती. परंतु आता ही बोटसेवा पुन्हा एकदा चालू करण्यात येणार आहे. देशातील वेगवेगळे सण उत्सव आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर आता 1 सप्टेंबर पासून ही बोट सेवा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या आधी उरण भाऊचा धक्क्याची तिकीट दरात वाढ झालेली होती. परंतु आता पुन्हा एकदा या तिकीट दरात 15 रुपये कमी करण्यात आलेले आहेत..

अगदी आठवड्या भरावर गणपती सण तोंडावर आलेला आहे. अशावेळी अनेक लोक हे शहरातून त्यांच्या गावी जात असतात. मुंबईवरून अनेक लोक हे कोकणात गणपतीसाठी जात असतात. आता त्याच लोकांसाठी ही एक खूप मोठी दिल्यास देणारी बातमी आहेत. कारण आता ही बोट सेवा चालू झालेली आहे. आणि तिकीट दर देखील 15 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे. दरवर्षी पावसाळ्याचा हंगाम आला की, भाऊचा धक्का उरण या मार्गावरील बोटीतील प्रवास तिकिटात वाढ केली जाते.

यावर्षी देखील या बोटीच्या दरात वाढ केलेली होती. 26 मे पासूनच या मार्गावरील तिकीट दरात वाढ केलेली होती. आधी तिकिटाचे दर हे 80 रुपये होते. त्यानंतर ते 105 रुपये करण्यात आले. म्हणजेच या प्रवासाचे तिकीट 15 रुपयांनी वाढवण्यात आलेले होते. परंतु आता एक सप्टेंबर पासून पुन्हा एकदा हे 15 रुपयांनी वाढवलेले तिकीट कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता 1 सप्टेंबर पासून या मार्गावर जे प्रवास करतील त्यांना प्रौढांसाठी 80 रुपये, तर लहान मुलांसाठी 39 रुपये एवढे तिकीट दर आकारण्यात येणार आहे.

पावसाळी हंगामामध्ये समुद्राच्या पातळीमध्ये सारखा बदल होत असतो. तसेच वादळी वारे, हवामान खराब असते. समुद्रात उंच लाटा येत असतात. या सगळ्याची खबरदारी घेऊनच दरवर्षी पावसाळ्यामध्ये रेवस भाऊचा धक्का या सागरी जल मार्गावरील वाहतूक जून ते ऑगस्ट या महिन्यात बंद केली जाते. यावर्षी देखील ही वाहतूक बंद केली होती. परंतु आता सगळ्या सणांचा विचार करता आणि पावसाची शक्यता देखील कमी झाल्यानंतर या बोट सेवेचा आनंद 1 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा प्रवासी घेऊ शकतात.